संत नामदेव

संत नामदेव
नामदेव हे ‘मराठी’ तील पहिले चरित्रकार व 
आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’ च्या माध्यमातून भागवत
 धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.
मराठी  तील पहिलेच चित्रकार व आत्मचचित्रकार आपण कितर्ना
च्या माध्यमातनू भागवत धर्म  पंजाबात  नेणारे आद्य प्रचारक!
भक्त शिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानदेवांच्या कालखंडात होऊन
गेले. नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले                                                
महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कितर्नकलेमुळे
प्रत्यय  पांडुरंगाला डोलायला लावणारा असा त्यांचा बहिश्वर
प्राणहोता. संत नामदेव प्रत्यय  श्रीविठ्ठलाच्या निकटवर्तीय  असलेला
सखा होता. पढंरपूर च्या भागवत धमार्ची पताका पंजाबात घऊेन
जाण्याचे कार्य  त्यांनी स्वकर्तववाने केले . सतं नामदेव हे वारकरी
संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी भावनिक
एकात्मता साधली .
दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्त्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके ११९२ (इ.स.१२७०)मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. संत नामदेवांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली.
भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या
 कालखंडात होऊन गेले. नामवेदाचे व नामविद्येचे आद्य 
प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होते 
. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला
 डोलायला लावणारा असा त्यांची 
कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या
 निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. 
संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे 
महान प्रचारक असून भारतभर 
त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता 
साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.

दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्त्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके ११९२ (इ.स.१२७०)मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. संत नामदेवांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली.संत गोरा कुंभार यांच्याकडे, तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले.
पत्‍नी राजाई, मोठी बहीण आऊबाई; नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वतःला नामयाची दासीअसे म्हणणार्‍या संत जनाबाई याही त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.
संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांना मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार व चरित्रकार मानले जाते. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथेतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.
संत ज्ञानेश्ववरांच्या भेटीनंतर (इ.स.१२९१) संत नामदेवांचे आयुष्य पालटले. अनेक संतांबरोबर त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केल्या. त्यांच्या सद्गुरूंनी म्हणजेच विसोबा खेचर यांनी त्यांना ब्रह्मसाक्षात्कार घडवून आणला, असे म्हणतात. त्यांच्या कीर्तनांत अनेक सद्ग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगीहे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.