माणिक बंडोजी इंगळे
जन्म: एप्रिल २७, १९०९
यावली, जि. अमरावती
मृत्यू : ऑक्टोबर ११, १९६८
गुरू :आडकोजी महाराज
साहित्यरचना:
ग्रामगीता, अनुभव सागर भजनावली,
सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली
कार्य:
अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची " ग्रामगीता ' म्हणजे त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या गावाचे आणि ग्रामसंस्कृतीचे नितळ रूप होय . तुकडोजी महाराज गावागावाच्या सेवेसाठी आयुष्यभर भटकत राहिले . त्यांनी खेड्यापाड्याच्या रूपात उभ्या असलेल्या गाव - संस्कृतीचे उत्कट दर्शन घेतले आणि ते ग्रामगीतेतून समर्थपणे व्यक्त झाले .
ग्रामोन्नतीच्या तळमळीतून प्रकटलेले आर्त उद्गार म्हणजे ग्रामगीता होय . तुकडोजी महाराज म्हणायचे , " माझा देव साधनारूपाने देवळात वा वनात असला , अनुभवरूपाने तो मनात वा चिंतनात असला तरी कार्यरूपाने तो जनात आहे . विस्तीर्ण स्वरूपात पसरलेली गावे , हीच माझी दैवते आहेत . ग्रामसेवा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ही ग्रामगीता ग्रामदेवतेलाच अर्पण केली आहे . हा गाव सुखी व्हावा . सर्वार्थाने समृद्ध व्हावा . परस्परांचा स्नेहभाव जागवावा . ज्यांचे हात श्रमांसाठी पुढे सरसावले आहेत , त्यांच्या श्रमांना प्रतिष्ठा मिळावी , मानवतेचे तेज झळाळावे , या आर्त तळमळीने त्यांनी ही ग्रामगीता अर्पण करून ग्रामजीवनात समृद्धीचे पूर्णत्व आणणारी ग्रामदेवता जनमनात जागवली आहे .
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा मृत्यु ११ ऑक्टोबर १९६८ रोजी झाला .